Share

‘तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवालाच नको; ही कसली पद्धत?’ राज ठाकरेंचा हल्लाबोल

Published On: 

पुणे : पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. पुण्यातील आठ मतदारसंघातील पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असा सवाल राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.

ते म्हणाले, ‘सरकार व पक्षांचे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत, तेथे गर्दी जमत आहे. फक्त सरकारला गणेशोत्सवाची गर्दी नको आहे. नियम हे सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत. एकंदरीत या लॉकडाऊन मध्ये जे चालले आहे ते बर चालले आहे हे सर्व सरकारांना लक्षात आले आहे. आंदोलन नाही, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, लोकांनी रस्त्यावर उतरायचे नाही, त्यामुळे कोणती झंझटच नसल्याने आपापले पैसे कमवा, दुकाने चालवा असेच एकंदरीत धोरण आहे.’

कोरोनाची लाट आणि शाळांच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नुसती कोरोनाची तिसरी लाट येणार, चौथी लाट येणार म्हणून भितीचे चित्र उभे केले जात आहे. शाळांमधील मुलांना लस देता येत नाही, त्यामुळे शाळा कशी सुरू करणार? मुलांचं लसीकरण झालं नाही. पुनावालांचंही स्टेटमेंट आहे. पण लसीकरण पूर्ण झालं नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!