Share

‘मुख्यमंत्र्यांच्या घरातील दोघे पॉझिटिव्ह; अन् बेअक्कल संज्या म्हणतो पापी लोकांनाच कोरोना होतो’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : शिवसेना नेते संजय राऊत हे शनिवारी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या खेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपावर टीका केली. भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली. पाप केलं की कोरोना होतोच, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली होती.

त्यांच्या या टीकेवरून भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांची अक्कलच काढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरातील दोन जण पॉझिटिव्ह होते अन् संजय राऊत म्हणतात पापी लोकांनाच कोरोना होतो असे म्हणत हल्लाबोल केला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट केले की, ‘मी नेहमी सांगत आलो संज्याला काडीची अक्कल नाही. काल परवा एका सभेमध्ये बोलताना संज्या म्हणतो की ज्याने पाप केलंय त्यांनाच कोरोना होतो. पण संज्या विसरला मुख्यमंत्र्याच्या घरातील दोन सदस्यांना कोरोना होऊन गेलाय’ या शब्दांत राणे यांनी जहरी टीका केली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
खेडमध्ये राऊत म्हणाले की, भाजपला कोरोना झाला म्हणून भाजप सत्तेतून बाहेर गेली. पाप केलं की कोरोना होतोच. तसेच त्यांनी उपस्थितांना मास्क घालण्याचे आवाहन केले. तुम्ही मास्क नाही घातलं तर उद्धव ठाकरे आपली चंपी करतील. आधी माझी चंपी करतील. नंतर तुमचं नाव घेऊन फटकारतील. कोरोनाची युती होऊ शकत नाही, तुला मंत्रीपद देतो, महामंडळ देतो असं चालत नाही. मुख्यमंत्री आपले आहेत. सांगतायेत नियम पाळाय. कोरोना कुठूनही घुसतो, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!