औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. एकूण विजयी झालेल्या उमेदवारांपैकी ३० टक्के तरुण कारभारी निवडून आलेत. विजयी उमेदवारांत तिशीच्या आतील तरुणाईची संख्या अधिक आहे. या नव्या दमाच्या चेहऱ्यांनाही राजकारणातील प्रवेश आश्वासक जाणवत आहे. गावासाठी काही तरी करून दाखवण्याची संधी त्यांना मतदारांनी दिली आहे. त्यापैकी अनेकांना केवळ सदस्य म्हणून अनुभव घेण्यात इंटरेस्ट आहे. तर अनेकांना पहिल्यांदात सरपंचपद मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात ४६९९ सदस्यांच्या या निवडणुकीत ६१० सदस्य बिनविरोध निवडून आले होते. १६ जानेवारीला ४०८९ सदस्यांची प्रत्यक्ष निवडणूक झाली. त्यासाठी ११ हजार ४९९ उमेदवार रिंगणात होते. वैजापूर १०५, सिल्लोड ८३, कन्नड ८३. पैठण ८०, औरंगाबाद ७७, गंगापूर ७१, फुलंब्री ५३, सोयगाव ४०, तर खुलताबादमध्ये २५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. यात ३० टक्क्यांहून जास्त तरुण उमेदवार निवडून आलेत.
वैजापूर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तालुक्यातील २१ ते ३२ वयोगटातील सर्वाधिक सदस्य असण्याची शक्यता आहे. सरपंच पदाच्या सोडतीनंतर जिल्ह्यातील सर्व सदस्यांची माहिती निवडणूक यंत्रणेकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त होईल. त्यानंतर जिल्हा प्रशासन पंचायत विभागाला सदस्यांची जिल्ह्याची एकत्रित संकलित यादी देईल. तेव्हा नेमकी आकडेवारी समोर येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण समाजाचे ताम्हण-पळी बजाओ आंदोलन
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये शेवटचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी नाहीच !
- काँग्रेसकडून प्रियांकांची ‘इमेज बिल्डिंग’; तब्बल १० लाख कॅलेंडरचे वाटप !
- लाख रुपये देऊन लग्नगाठ बांधली, आठ दिवसांतच नवरी पळाली!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

