औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राज्यात सध्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे एकाच चितेवर आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. हे अत्यंत विदारक चित्र असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. हाच धागा पकडून खासदार जलील यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक व्हिडीओ भाषण व्हायरल होत आहे. हे भाषण तसे जुने आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी फत्तेपूर इथल्या सभेमध्ये कब्रस्थान आणि स्मशान भूमी संदर्भात बोलत आहे. गावात जर कब्रस्थान तयार होणार असेल तर गावामध्ये स्मशानदेखील तयार व्हायला हवे, असे मोदी या भाषणामध्ये सांगत आहे. याच भाषणावर खासदार जलील यांनी टीका केली आहे.
…. aur kabristan aur shamshan mein lashon ka dher bhi lagna chahiye! You forget to mention that Mr Modi! https://t.co/lIikg4HoIL
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) April 16, 2021
हे भाषण शेअर करत खासदार जलील म्हणाले की, ‘…आणि कब्रस्थान आणि स्मशानामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचा उल्लेख करायला मोदी विसरले आहेत.’ राज्याची आणि एकूणच देशाची स्थिती पाहता, मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार त्या संबंधी उपाय करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना हवे तसे यश मिळतांना दिसत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परब सेवाभावी मंत्री; सेवा आणि मेवा कुठे जातो याची चौकशी व्हावी ! – राणे
- पालघर प्रकरणातील साधूंना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही – कदम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- मला हाफकिनचे सामर्थ्य माहित आहे; जितेंद्र आव्हाडांनी मानले पंतप्रधानांचे आभार !
- ‘कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत’


