🕒 1 min read
मुंबई : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा प्राण्यांच्या आवाजानेच प्रचंड गाजल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनात कधी मांजर, कधी श्वानाचा वारंवार उल्लेख करत एकमेकांना प्राण्यांच्या उपमा देत सत्ताधारी विरोधकांमध्ये टीकाटीपण्णी, शाब्दिक युद्ध चांगलेच रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.
विधीमंळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Assembly) यंदा जनतेच्या प्रश्नांच्या तुलनेत कुत्र्या-मांजरांचा वारंवार उल्लेख करणे, हा सर्व प्रकार अत्यंत लज्जास्पद असल्याचे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांना चांगलंच खडसावले आहे.
ज्या लाखो मतदारांनी विश्वास टाकल्यानंतर आमदार (Maharashtra MLA) इथपर्यंत पोहोचतात, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. असे वागलात तर लाखो मतदारांच्या विश्वासाला तडा जाईल. सदस्यांनी आपण काय बोलतोय, याचे भान ठेवा, असे सांगत अजित पवार यांनी सभागृहामध्ये बोलताना आमदार मंत्र्यांनचेही कान टोचले आहेत.
‘प्राण्यांचा आवाज काढणं हा मतदारांच्या विश्वासाला तडा जाणे आहे. त्यांचा अपमान करणे आहे. मतदारांना काय वाटेल, आपला माणूस तिथे जातो आणि अशा पद्धतीने आवाज काढतो, टवाळी करतो? त्यामुळे सगळ्यांनीच चारही प्रमुख पक्ष, इतर अपक्ष सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- रुईकर कुटूंबियांना शिवसेनेतर्फे ५ लाखाची मदत; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली कुटुंबियांची भेट!
- असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये; खडसे हल्ला प्रकरणी चाकणकरांची प्रतिक्रिया
- “…तरीही राज्यपाल अडथळा आणत असतील तर त्यांच्यावर दबाव आहे”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
- “अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना तत्काळ अटक करा”, चित्रा वाघ आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

