मेरठ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे भरभरून कौतुक केले. योगी सरकारची कायदा आणि सुव्यवस्थेवर पकड असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.
पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते योगी आदित्यनाथ यांना कायदा आणि सुव्यवस्था उत्तर ठेवल्याचे प्रशस्तिपत्रक देण्यात आले. मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या (Major Dhyanchand Sports University) भूमिपूजनानंतर पंतप्रधानांनी खेळाचा संदर्भ घेत यापूर्वी राज्यात गुन्हेगारांची मनमानी सुरू होती, मात्र आता परिस्थिती बदलल्याचे चित्र उत्तर प्रदेशात आहे. आणि हे योगी सरकारने शक्य करून दाखवले असल्याचे त्यांनी म्हटले.
https://twitter.com/narendramodi/status/1477623700543324165
दरम्यान यावेळी मोदींनी मेरठ व आसपासच्या नागरिकांना घरे जाळल्यामुळे आपल्याच घरातून स्थलांवर करावे लागले होते याची आठवण करून देत र्वीच्या सरकारांमध्ये बेकायदा जमीन बळकावण्याच्या स्पर्धाच सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच योगी सरकारने नवे साखर कारखाने उभारत शेतकऱ्यांना उसाचा अधिक दर दिला असल्याचे कौतुकही मोदींनी केले.
महत्वाच्या बातम्या:
- एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल, यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय?
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना “भारतरत्न” मिळाला पाहिजे- रुपली पाटील ठोंबरे
- आजपासून देशात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणास सुरवात
- “मोदीजी आता चीनची वाट लावणार, त्यांचे डोळे बघा लाल…”, सचिन सावंतांची खोचक टीका


