उत्तर प्रदेश : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांचे एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. गजवा-ए-हिंदचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही, असे योगी म्हणाले आहेत.
योगी यांनी कर्नाटकमधील हिजाब वादावर भाष्य केले असून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी भगवे कपडे घालावेत असं मी म्हणून शकतो का? लष्करामध्ये कोणालाही कोणताही पोशाख घालण्याची परवानगी देता येईल का? तशाच पद्धतीने शाळांमध्ये ड्रेसकोड आवश्यक आहे, असे योगी म्हणाले. तसेच भारत शरीयतनुसार चालणार नाही तर संविधानानुसार चालणार आहे हे तालिबानी विचारसणी असणाऱ्यांनी लक्षात ठेवाव, असेही योगी म्हणाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत बोलत असतांना योगी म्हणाले होते की, ‘नव्या भारतामध्ये सर्वांचा विकास होईल. कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही.’ तसेच नवीन भारत संविधानानुसार काम करेल शरीयतप्रमाणे नाही असेही योगी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- IPL AUCTION 2022: मेगा ऑक्शननंतर अशी आहे रोहित शर्माची ‘पलटन’
- “काही दिवसांत भाजपचे साडे तीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील”, संजय राऊतांचा मोठा दावा
- IPL AUCTION 2022: बँगलोरचा ‘रॉयल’ संघ प्रतिस्पर्धीना चॅलेंज देणार
- “महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते आई आणि मावशीचे पण मोदींनी..”, नाना पटोलेंचा टोला
- पाटलांच्या वक्तव्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने बोलणे योग्य नाही- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

