Share

‘कालच्या घटना दुरुस्तीने हे अधिकार केंद्राकडेच होते हे सिद्ध झाले’-अरविंद सावंत

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : संसदेत काल १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. यामुळे राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा देण्यात आला आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता समाजाला नवी आशा निर्माण झाली असली तरी विरोधकांनी मात्र या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाला फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथे शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी खासदार अरविंद सावंत बोलताना म्हणाले कि, ‘भाजपकडून कालपर्यंत महाराष्ट्र सरकारवर आरोप केले जात होते. राज्याकडेच आरक्षणाचा अधिकार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, कालच्या घटना दुरुस्तीने हे अधिकार केंद्राकडेच होते हे सिद्ध झालं आहे. काल आम्हीही दुरुस्ती सूचवली. पण आमच्या दुरुस्तीला भाजप खासदारांनी समर्थन दिलं नाही,’ असं खासदार अरविंद सावंत म्हणाले.

शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी देखील हल्लाबोल केला आहे. ‘हे विधेयक म्हणजे आजारी माणसासारखं आहे. सरकारने आजारी माणसाला गोळी दिली. पण ती अर्धीच दिली. मग तो बरा कसा होणार?’ अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!