सोलापूर – सोलापूर शहरातील कोरोना बाधितांचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र निर्बंध शिथिल झालेले नाहीत. निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे प्रस्तावावर त्यांची स्वाक्षरी झाली नाही. येत्या दोन दिवसात त्यांची स्वाक्षरी होईल आणि पुण्याप्रमाणे सोलापुरातही शिथिलता मिळेल, असा खुलासा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल केला. निर्बंध शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री ठाकरे यांची याबाबत पालिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर स्वाक्षरी होईल आणि सोलापूर शहरातही पुण्याप्रमाणे शिथिलता मिळेल, असं भरणे यांनी सांगितलं.
दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, करमाळा, माळशिरस आणि सांगोला या पाच तालुक्यांत 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्याचा जिल्हा प्रशासनानं निर्णय घेतला आहे. या निर्णयाला व्यापारी महासंघाने तीव्र विरोध केला असून काल यासंदर्भात आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. संचारबंदी निर्णयाच्या विरोधात मंगळवारपासून तीन दिवस आंदोलन करण्याचा या बैठकीत निर्णय झाला.
दरम्यान, आमदार समाधान अवताडे यांनीही व्यापाऱ्यांची भेट घेतली. लवकरच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. आषाढी वारीसह अनेक धार्मिक सोहळे रद्द केल्यानं अनेकांचा व्यवसाय बंद पडला आहे. त्यातच आता संचारबंदीचा आदेश काढल्यानं हातावर पोट असलेल्या व्यावसायिक आणि नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तसेच करमाळा आणि सांगोल्यात याविषयावर आज व्यापाऱ्यांची बैठक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोईन अलीचे संघात पुनरागमन
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

