Share

‘ये कप्तान है टॉस भी जितेगा मॅच भी’, ट्विटरवर रोहितचा ट्रेंड

Published On: 

जयपूर : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात केली. सूर्यकुमार यादवने ४० चेंडूंत ६२ धावा आणि कर्णधार रोहित शर्माने (३६ चेंडूंत ४८ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर आघाडी मिळविली.

तसेच रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाचाही विजयी प्रारंभ झाला. भारताच्या या विजयानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच आधी टॉस आणि नंतर सामना जिंकल्यानंतर ट्विटरवर रोहितचे कौतुक करत मिम्स देखील शेअर करण्यात आल्या आहे.

https://twitter.com/gujju_105/status/1460959295764197382?s=20

https://twitter.com/Nishidhoni/status/1461019157227474944?s=20

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या न्यूझीलंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित आणि के. एल. राहुल (१५) यांनी पाच षटकांतच भारताचे अर्धशतक केले. मिचेल सँटनरने राहुलला बाद करत भारताला पहिला झटका दिला. रोहितला मग सूर्यकुमारची उत्तम साथ लाभली. त्यांनी ५९ धावांची भागीदारी रचल्यावर ट्रेंट बोल्टने रोहितला माघारी पाठवले. सूर्यकुमारच्या ६२ धावांच्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यावर ऋषभ पंतने नाबाद १७ महत्वाचे योगदान देत भारताला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!