मुंबई : राज्यात शिवसेना- भाजपची युती तुटली आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणीची समीकरणंच बदलली. शिवसेना आणि भाजपमध्ये 50-50 फॉर्मुल्यावरुन मोठा वाद झाला. त्यानंतर मुख्यमत्रिपदावरुन झालेल्या सेना-भाजपच्या या वादाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला आणि शिवसेनेसोबत हातमिळवणी करुन सत्तेत आले. शिवसेना-भाजप आणि इतर मित्रपक्षांनी पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन करण्याबाबत आता पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद किती वर्षे द्यावं याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थपन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करावे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थपन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल;त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजप ला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा महायुती चे सरकार स्थापन करावे. @Dev_Fadnavis @OfficeofUT pic.twitter.com/UNMEsdNSSp
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) November 17, 2021
दरम्यान, रामदास आठवले यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवेसना आणि भाजप यांच्यात वाटून घ्यावं, असं मत मांडलं होता. मात्र आता ते 5 वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास तयार झाले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणं पुन्हा बदलतील का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आधी तक्रारींचे निराकरण मगच नियुक्त्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक


