🕒 1 min read
अमरावती: पायाला पडलेल्या भेगा, हातावर असलेले घट्टे आणि चेहऱ्यावरील खड्डे हेच शेतकऱ्यांच्या मुलीच खरं सौंदर्य असतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींना कुणीही हिणवण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात अमरावती जिल्ह्याच्या पालक मंत्री यशोमती ठाकूर यांनी टीकाकारांना सुनावले आहे. त्या नांदगाव पेठ येथील अंगणवाडी केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यात बोलत होत्या.
सौंदर्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरचा विठोबा आणि रुक्मिणी हेसुद्धा सावळ्या रंगाचेच होते. नट्टापट्टा करून आपल्याला कुठेही मॉडेलिंग करायला जायचे नाही आपण शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्यातच धन्यता मानतो. आपल्याला कुठेही मिरवण्याची गरज नाही ,असा टोलाही ठाकूर यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
-
“राज्यात जशी महाविकास आघाडी झाली तशीच…” ; अमित देशमुखांचे मोठे विधान!
-
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारंपारिक रेला नृत्यावर धरला फेर
-
वय २१ वर्षे, धावा नाबाद ३६५, वेळ ६१४ मिनिट, ‘या’ अष्टपैलूचा विक्रम आजही अबाधित
-
Russia vs Ukraine war: हा सगळा श्रेयवादाचा प्रकार; बच्चू कडू यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
