🕒 1 min read
मुंबई : क्रिकेट जगतात सगळीकडे उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना २ दिवसानंतर सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
मात्र या दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघ आजपासुन म्हणजे १६ जुन पासुन इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्याचे वैशीष्ट म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघा तब्बल सात वर्षानंतर कसोटी सामना खेळणार आहे. या संघातील मोजक्याच खेळाडुंना कसोटी सामन्याचा अनुभव आहे. मात्र तोही सात वर्षापुर्वीचा. तेव्हा आजपासुन सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेरचा कसोटी सामना हा ७ वर्षापुर्वी २०१४ साली दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या दौऱ्यात महिला संघाला एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. २७ जुन ते १५ जुलै या कालावधीत एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळविण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कसोटी महाभारत! अंतिम लढतीसाठी भारतीय संघाची घोषणा
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
