मुंबई : विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 33 आरक्षण देण्याचा कायदा अद्याप प्रलंबित आहे. महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण देणारा कायदा संसदेत मंजुर करावा यासाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महिलांना न्याय मिळाला पाहिजे. महिलांचे शोषण थांबले पाहिजे, समस्त महिला वर्गाला न्याय मिळण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कटीबद्ध आहे असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले, ‘महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल सादर केले. ते हिंदू कोड बिल तत्कालीन सरकारने संसदेत मंजूर केले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता, असं देखील त्यांनी नमूद केलं आहे.
तर, ‘महिलांच्या न्याय हक्कासाठी भारताचे पहिले कायदा मंत्री असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील आमचा रिपब्लिकन पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष महिलांच्या न्याय हक्क साठी महिलांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा पक्ष आहे. विश्वातील कर्तृत्ववान महिलांना न्याय मिळाला पाहिजे’ असे सांगत रामदास आठवले यांनी आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बहाल केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘गुजरातपेक्षा १० रुपयांनी पेट्रोल मुंबईत महाग, आता राज्य सरकारने टीकेचा हक्क गमावलाय’
- #Maharashtrabudget2021: यंदाच्या अर्थसंकल्पातून पुण्याला काय मिळाले?
- मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या संदर्भातील केसचा तपास NIA करणार
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- कोणतेही रडगाणे न गाता जिद्दीने महाराष्ट्र थांबला नाही, थांबणारही नाही; मुख्यमंत्री खुश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

