मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. ही गाडी अंबानींच्या घराजवळ आढळण्याच्या आठ दिवस आधीच चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. गाडीच्या मालकाने तक्रार नोंदवली होती.
पोलिसांनी स्फोटकांसह गाडी जप्त केल्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची चौकशी केली. या चौकशीत सहकार्य करत असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवार ५ मार्च रोजी ठाणे जिल्ह्यातील रेतीबंदर येथे आढळला होता.
या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या मुद्द्यावरून राजकीय कलगीतुरा देखील रंगताना पाहायला मिळत असताना आता अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके आढळली होती. या प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सोपवला आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती.
तर दुसऱ्या बाजूला ज्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके आढळली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएस करणार आहे. एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणी पत्नीने केलेल्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून हत्या करणे आणि हत्या करुन पुरावे नष्ट करणे असेही आरोप एफआयआरमध्ये दाखल केले.
महत्त्वाच्या बातम्या :
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- ‘गुजरातपेक्षा १० रुपयांनी पेट्रोल मुंबईत महाग, आता राज्य सरकारने टीकेचा हक्क गमावलाय’
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- घायवळ,आंदेकर,मारणे पाठोपाठ आणखी एका कुख्यात गुंडाच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या


