Share

‘या’ गोष्टीशिवाय संजय राऊतांना जेवणच पचत नाही; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : साताऱ्यामधील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित जमीन, इमारत, प्लांट, मशीन अशा ६५ कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर गुरूवारी सक्तवसुली संचलनालयाने टाच आणली आहे. या कारखान्याचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जोडला जात आहे. मात्र, आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळलेत. पण आता या मुद्यावरुन राजकारण सुरु झालं आहे.

‘जे सत्ता स्थापन करण्यात किंवा सत्तेत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाया केल्या जातात. एका कारखान्यावर लाखों लोकांचं जीवन अवलंबून आहे. कारवाई करण्याची धमकी दिली जातेय. हे निर्मळ राजकारण नाही. आमने सामने लढाई करावी. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ईडी, सीबीआयचा हा वापर हा तर पाठीतला वार आहे. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही. पण राज्याला हे शोभा देत नाही’, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता.

यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही’, असा टोला फडणवीस यांनी लगावला. फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ गावी मूल येथे आज आले होते. येथून परतताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!