Share

सत्तासुंदरी हातातून गेल्याने भाजपच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे; शेट्टींचा पलटवार

Published On: 

🕒 1 min read

इचलकरंजी : केंद्र सरकारच्या आणलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून थंडीत हे आंदोलन शेतकरी करत आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

कृषी कायद्यावरून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे सुरु असलेल्या आंदोलनावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जहरी टीका केली आहे. राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. यावरूनच आता शेलार विरुद्ध शेट्टी अशी शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी शेलारांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आशिष शेलार यांच्या हातून सत्तासुंदरी गेली आहे. त्यामुळे शेलारसह त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे. भाजप नेत्यांना ध्यानीमनी नुसती सत्ताच दिसत आहे,’ असा पलटवार राजू शेट्टी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!