Share

राज्यात मास्कमुक्ती होणार? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मास्कमुक्ती केली जाणार का? याबाबत चर्चा रंगली होती. कारण कोरोना रुग्णसंख्याही घटत आहे, त्यातच निर्बंधातही बऱ्याच प्रमाणात शिथिलता करण्यात आली आहे. त्यामुळे आता मास्कमुक्ती बाबतही निर्णय घेतला जाणार का, असे म्हटले जात होते. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

“करोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार, मास्कमुक्ती कधी होणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण मास्कमुक्ती नेमकी कधी होणार, याबद्दल आताच पूर्ण खात्रीने काहीही सांगता येणार नाही. आता आपल्याला हा जो काळ भेटला आहे, तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच आता कोरोनाची लाट कमी होत असतांना लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही करोनाची लागण होते. पण त्याची घातकता नक्कीच कमी होते. त्यामुळे प्राण वाचवण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ते अलिबाग येथील उसरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!