Share

“राज्यात २०२५ पर्यंत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक”, सुभाष देसाई यांची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai)यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात २०२५ पर्यंत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, या माध्यमातून राज्यातील लाखो लोकांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते महा इन्फ्रा कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

ते म्हणाले की, “नवी मुंबईत जेम्स ज्वेलरी पार्क उभे करण्यात येत आहे. जागतिक दर्जाचं हे जेम्स ज्वेलरी पार्क असेल. त्यामुळे दीड लाख कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे. सोबतच यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. सोबतच नवी मुंबईत टाटा संकूल उभारण्यात येणार असून, देशासह राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. या संकूलाच्या माध्यमातून विक्रमी १.७५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.”

https://bit.ly/3LO8AOz

तसेच शासनाचा तळेगाव आणि औरंगाबादमध्ये ईलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारण्याचा विचार असून या माध्यमातून सरकारचा इलेट्रॉनिक उत्पादनामध्ये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न आहे. या ईलेक्ट्रॉनिक पार्क माध्यामातून रोजगार सोबतच स्वस्तात इलेट्रिक वाहने देखील मिळणार असल्याचे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!