मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत ही पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात गेली होत. तिथे तिने खळबळजनक खुलासे केले होते.
आता राखी दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. बीग बॉसच्या अंतिम फेरीतून बाहेर पडलेल्या अभिनेत्री राखी सावंतच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्यात येणार आहे. तसा दावा राखी सावंतने केला आहे. या गोष्टीला लेखक जावेद अख्तर यांनीही पुष्टी दिलीय. त्यामुळे आता लवकरच राखी सावंतचे जीवन प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे.
जावेद अख्तर यांनी स्पॉटबॉय ला दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट सत्य असल्याचं सांगितलंय. ते म्हणाले की, “राखी सावंत जो दावा करतेय तो सत्य आहे. चार-पाच वर्षापूर्वी आम्ही एका फ्लाइटमध्ये भेटलो होतो. त्यावेळी राखीने आपल्या लहानपणीच्या आठवणींबद्दल आपल्याला सांगितलं होतं.
त्यावेळी मी तिला सांगितलं होतं की मी एक दिवस तुझ्या आयुष्यावर आधारित स्क्रिप्ट लिहिणार आहे. आता राखी सावंतच्या जीवनावर आधारित बीओपीक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- स्वॅब न देताच रुग्ण येत आहेत कोरोना पॉझिटिव्ह; बुलढाण्यातील अजब प्रकार समोर !
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू


