🕒 1 min read
मुंबई : कर्नाटक राज्यातील उडपी येथे काही शाळेत शिकणाऱ्या मुली धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू पाहत होत्या,परंतु उडपी मधील त्या शाळेच्या प्राचार्यांनी त्या मुलींना धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू दिला नव्हता. यावरून देशभर मोठ्या प्रमाणात वादंग उठला आहे. या वादाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले असून राजकीय पक्षांनी देखील यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, गृहमंत्राच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘गृहमंत्र्यांनी हे शहाणपण आधी हा मुद्दा तापवणाऱ्या आपल्याच पक्षाला सांगावे. हिजाबचे समर्थन करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबची परवानगी देणार आहे का? हेही राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विचारून घ्यावं’, असा खोचक टोला भातखळकरांनी लगावला आहे.
गृहमंत्र्यांनी हे शहाणपण आधी हा मुद्दा तापवणाऱ्या आपल्याच पक्षाला सांगावं. हिजाबचे समर्थन करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबची परवानगी देणार आहे का, हेही @supriya_sule यांना विचारून घ्यावं. pic.twitter.com/OJMnAVA08j
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 12, 2022
दरम्यान, ‘परराज्यातल्या एखाद्या मुद्द्यावर आपल्या राज्यातली शांतता बिघडवू नका.जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये.माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावं.’ तसेच जे मी सामान्य नागरिकांना सांगितले तेच राजकीय पक्षांनाही सांगतो आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये, असे गृहमंत्री म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 MEGA AUCTION: जाणून घ्या, पहिल्या दिवशी कोणत्या प्लेयर्सचे ऑक्शन होणार!
- “भाजपमुळे हातात पुस्तकांऐवजी दगड, तोंडात पाढ्यांऐवजी जय श्रीराम बोलून..”, कॉंग्रेसचा गंभीर आरोप
- IND vs WI : वेस्ट इंडिजचा भारताकडून व्हाईट वॉश
- “…हे किरीट सोमय्यांच्या लढ्याचे यश आहे”, अतुल भातखळकरांचा कॉंग्रेसला टोला
- “राष्ट्रवादी राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देणार का?”, भातखळकरांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
