Share

शेवटच्या तीन टी-२० सामन्यात मैदानात प्रेक्षकांना प्रवेश नाही

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लड संघादरम्यान पाच टी-२० सामन्याची मालिका अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या मैदानावर होत आहे. सद्यस्थितीत आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेने प्रवेश दिला जात आहे. मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता उर्वरित सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.

सोमवारी संध्याकाळी बीसीसीआयने या संदर्भात टि्वट करुन एक पत्रक जाहीर केले आहे. चाहत्यांची आणि खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. आमचे पहिले प्राधान्य हे सुरक्षिततेला आहे असे बीसीसीआयने सांगितले आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करणा आवश्यक आहे.

मागील काही दिवसापासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच आहे. उर्वरीत सामन्याची ज्या प्रेक्षकांनी तिकीटे खरेदी केलेली आहेत त्या प्रेक्षकांचे पैसे लवकरच परत केले जातील. यासंदर्भात माहिती आम्ही लवकरच देऊ. असे बीसीसीआयने या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!