कोल्हापूर: २०२० मार्च मध्ये पुणे शहरात महाराष्ट्र राज्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला आणि हळू हळू कोरोनाने महाराष्ट्रभर आपले हात पाय पसरायला सुरुवात केली. २०२० मध्ये आलेल्या पहिल्या लाटेनंतर २०२१ च्या मार्च महिन्यात कोरोनाची देशभरात दुसरी लाट आली. तर २०२१ च्या अखेरीस कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने देशभरात हात पाय पसरायला सुरुवात केली. कोरोना विषाणूच्या पहिल्या दोन लाटांपेक्षा कोरोनाची तिसरी लाट ही अतिशय सौम्य आहे. त्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण देशभरात तसेच राज्यात वाढल्याने कोरोना विषाणूची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणत कमी झाली आहे. हा सर्व आढावा घेऊनच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज एक खुलासा केला आहे.
‘राज्यात करोनाची तिसरी लाट फारशी गंभीर नाही, त्यामुळे निर्बंध टप्प्याटप्याने कमी करण्यात येतील, मात्र मास्कमुक्ती सध्या तरी होणार नाही,’ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. फ्रान्स, जर्मनसह काही देशात मास्कमुक्ती निर्णयामागील नेमके तंत्र काय होतं, याची माहिती संकलित करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. तेव्हा पत्रकारांशी संवाद ते म्हणाले, करोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. यामुळे मास्कमुक्तीबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली. पण, मास्कमुक्तीचा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही. काही देश कोणत्या पद्धतीने मास्क फ्री झाले याची माहिती घेण्यात येत आहे. टास्क फोर्स आणि केंद्राकडे ते पाठवून पुढील निर्णय घेतला जाईल. पण तोपर्यंत निर्बंध मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येतील.
महत्वाच्या बातम्या :
- आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटवा; शिवसेना आमदारांची मागणी
- भाजपच्या माजी खासदाराला अश्लील व्हिडिओ दाखवून फसवले, लुटले हजारो रुपये
- पुष्पाची क्रेझ थांबेना! श्रीवल्ली गाण्यावर थिरकली राणू मंडल; व्हिडीओ व्हायरल
- “गेल्या दहा वर्षांत उत्तराखंडची जनता काँग्रेसला लोकसभेत शून्य देत आहे”,नरेंद्र मोदींचा
- टांझानियातील किली आणि नीमा पॉल यांची लता दीदींना आदरांजली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

