🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मागील काही दिवसांपासून फरार आहेत. दोघांचाही शोध पोलिसांना लागत नाही. त्यांना शोधण्यासाठी आता राज्यभर पोष्टर लावायची काय? असा संतप्त सवाल करत भाजपाने आघाडी सरकार व पोलिसांवर निशाना साधला आहे.
भाजपाने ट्विटमध्ये पुढे म्हंटले आहे ‘एकेकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या गायब आहेत. तपास यंत्रणा त्यांचा कसून शोध घेत आहेत यांना शोधण्यासाठी आता राज्यात सर्वत्र पोस्टर लावायची काय?’ असे ट्विट भाजपा मुंबई ट्विटर हँडलवरुन केले आहे.
एकेकाळी मुख्यमंत्री @OfficeofUT यांचे खास असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP सध्या गायब आहेत.
तपास यंत्रणा त्यांचा कसून शोध घेत आहेत. यांना शोधण्यासाठी आता राज्यात सर्वत्र पोस्टर लावायची काय? pic.twitter.com/Z1jhQ3dHgP— BJP Mumbai (@BJP4Mumbai) September 24, 2021
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाऊद इब्राहिम चा सहकारी तारिक परवीन याने पोलीस कस्टडीत दिलेल्या जवाबानुसार सिंह यांना आरोपी करण्यात आले आहे. तर माजी गृहमंत्री परमबीर सिंह यांनी माजी सपोनि सचिन वाझे याच्यामार्फत बारचालकांकडून १०० कोटी वसूली प्रकरणात आरोपी आहेत.
मात्र तेव्हापासून परमबीर सिंह व अनिल देशमुख हे दोघेही फरार आहेत. त्यानंतर गुप्तचर विभागाने त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला मात्र ते हाती लागले नाहीत. यावरुन भाजपाने आघाडी सरकार व पोलिसांवर निशाना साधला आहे. या दोघांना शोधण्यासाठी आता राज्यात सर्वत्र यांची पोस्टर लावायची का? असा सवाल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुश्रीफांच्या बचावासाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; म्हणाले, ‘बदनामीचा कट हाणून पाडू’
- कमालच ! सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होण्याआधीच ‘या’ तारखेपर्यंतच तिकीट फुल्ल
- ‘परवा एका एकराला 18 कोटी दिले; आता लोकं भेटून सांगतात, दादा रस्ता तेवढा आमच्या शेतातून न्या’
- ‘…मग हे कसले घंट्याचे बेस्ट CM ?’ निलेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर विखारी टीका
- ओशो आश्रमातील गैरकारभाराची सरकारने चौकशी करावी; ओशो अनुयायांची आठवलेंकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
