मुंबई : मागील काही दिवसांपासून ड्रग्जसंदर्भातील आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. परंतु असे असतांनाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्व प्रकरणावर शांत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे या प्रकरणावर बोलणार की नाही?, याचा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान केला आहे.
एका मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री ड्रग्ज आरोप प्रत्यारोप प्रकरणावर का बोलत नाहीत? असे विचारण्यात आले असता राऊत म्हणाले की,’योग्य वेळी ते बोलतील. सध्या आम्ही पुरेसे आहोत. या विषयावर बोलणं हे मुख्यमंत्र्यांच कामच नाहीय. राज्य संभाळणं त्याचं काम आहे’, असे ते म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे अंडरवर्ल्डशीसंबंध नाही. मी भाजपामधले १० पदाधिकारी देऊ शकतो. जे तुरुंगांमधून शिक्षा भोगून बाहेर आहेत आणि आज पक्षाचे पदाधिकारी आहेत. कोल्हापूरातून कोणं आलं आहे, चेंबूरमधून कोण आलंय. तसेच कोण कोणत्या गँग चालवत होते हे मी द्यायचं ठरवलं तर माझ्यासारखा तज्ज्ञ माणूस नाही’, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

