Share

देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय म्हणजे महाविकास आघाडी सरकारवर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधतांना दिली आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासंदर्भात प्रतिक्रिया देत म्हणाले की,’भाजपने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.’

दरम्यान, विकासाच्या मुद्द्याच्या बाजूने कौल…राज्यातील जनता महाविकास आघाडीसोबत आहे, हे देगलूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले. सामूहिक प्रयत्नांना विजयाचे फळ आले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते व राज्याचे ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देगलूरच्या विजयाबद्दल अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!