मुंबई : त्रिपुरा येथील कथित हिंसाचारानंतर महाराष्ट्रातही नांदेड, अमरावती, मालेगाव या शहरांत दंगली उसळल्या, यात मोठे नुकसान झाले आहे. यावर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. या दंगली उसळण्यास कारणीभूत रझा अकादमी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे भडकाऊ भाषणे आहेत, मशिदीच्या नावाने खोट्या बातम्या परसरवल्या भडकाऊ भाषणे केली. ठाकरे सरकार या दंगोखोरांना का अटक करत नाहीत? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. सोमय्या म्हणतात, ठाकरे, पवार सरकार महाविकास अघाडीच्या भडकाऊ भाषणे करणाऱ्या नेत्यांना आणि रझा अकादमीच्या दंगेखोरांना का अटक करत नाही. ज्यांनी वोट बँकेसाठी मशिदीच्या नावाने खोट्या बातम्या पसरवल्या, भडकाऊ भाषणे केली. अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.
Why Thackeray Pawar Sarkar has not arrested
Leaders of MahaAghadi & Raza Academy Jinhone
Vote Bank & Appeasement ke liye
MASJID ke Nam Se
Juthi Khabre Failayi, Bhadkau Bhashan Kiye @BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 14, 2021
त्रिपुरा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराचे लोण आता महाराष्ट्रातही पसरले आहे. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम धर्मीयांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. या विरोधात रझा अकादमीने आक्रमक होत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बंद पुकारत मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चादरम्यान महाराष्ट्रातील नांदेड, अमरावती, मालेगाव या शहरात मोर्चांना हिंसक वळण मिळाले. यातून पोलिसांवर हल्ल्यांबरोबरच मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यावर आता भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर टीका करत रझा अकादमीवर बंदीसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- साठ वर्षांत प्रथमच विलीनीकरणाची एसटी कामगारांकडून मागणी- अजित पवार
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा फी मिळणार परत
- गडचिरोलीत पोलिसांची दमदार कामगिरी, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा!
- ‘जय भीम’ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार?; राऊतांचा रोखठोक सवाल
- सरकारची ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरल्याने रुग्णांचे मृत्यू – प्रविण दरेकर


