🕒 1 min read
मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन देखील करण्यात येत आहे. राज्यभरातील मराठा समाजाच्या बैठका होत असून मराठा समाजातील नेते देखील आरक्षण मिळावं यासाठी रणनीती आखत आहेत.
‘शाहू महाराज यांनी समाजाला आरक्षण दिले. मराठा समाज हा सर्व समाजाला सोबत घेऊन राहिला आहे. मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले आहे. मग आता मराठा समाजाला आरक्षणमधून बाहेर का फेकले जात आहे, असा सवाल खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थितीत केला.नवी मुंबईत मराठा आरक्षण बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्वच प्रकारच्या भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावर्षी मागणी मराठा समाजातील नेते करत आहेत. एमपीएससीच्या परीक्षा झाल्या तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील, असा गंभीर इशारा संभाजी राजे यांनी दिला आहे. एमपीएससीची सर्व परीक्षा केंद्र ११ ऑक्टोबरला बंद करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे आता एमपीएससीच्या परीक्षांबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावेळी राज्यभरातील काही एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा नाही झाली तर आमची वयोमर्यादा संपेल अशी भीती देखील व्यक्त केली. याला उत्तर देताना संभाजीराजे यांनी अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची वयोमर्यादा वाढवून द्या अशी देखील सरकारकडे मागणी केली.
महत्वाच्या बातम्या :-
- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
- ‘सेनेचे स्टार कॅम्पेनर्स बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार’
- मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा
- उद्धवा धुंद झाला तुझा दरबार ! मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी १३ ऑक्टोबरला राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण
- गुप्तेश्वर पांडेंचा झाला गेम : शुभचिंतकांना म्हणाले, ‘मला फोन करू नका,त्रस्त झालो आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
