नवी दिल्ली : ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते. आता भाजपामध्ये जाऊन बॅकबेंचर बनल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला आता ज्योतिरादित्य यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी आपली स्वत:ची चिंता करावी माझी चिंता करू नये, असा टोलाही ज्योतिरादित्य सिंधीयानी लगावला आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या बॅकबेंचर टीकेला प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, मी राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत बोलणे योग्य समजत नाही. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक स्तर असतो. गेल्या एक वर्षात मी खूप वर आलो आहे. राहुल गांधी आता माझी जेवढी चिंता करत आहेत. तेवढी चिंता त्यांनी मी काँग्रेसमध्ये असताना केली असती तर ते अधिक उचित ठरले असते, असा टोलाही सिंधीयानी यावेळी लगावला आहे.
राहुल गांधींनी ज्योतिरादित्य सिंधीयावर टीका करताना सिंधिया याच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह काम करून संघटनेला भक्कम करण्याचा पर्याय होता. एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री बनाल म्हणून मी त्यांना सांगितले होते. मात्र त्यांनी आपली वेगळी वाट निवडली. सिंधिया कॉंग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री बनू शकले असते, असा टोला राहुल गांधींनी काल लगावला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांच्या वर
- घाटीतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकरच : अमित देशमुख
- श्री नामदेव तीर्थक्षेत्र; अर्थमंत्र्यांची पोकळ घोषणा
- सरकारच्या ‘या’ प्लॅनमुळे सर्वसामन्यांसह शेतकऱ्यांना होणार फायदा
- ‘शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
