Share

काँग्रेसला महागाईची चिंता “यूपीए’’ सरकारच्या काळात का नव्हती?- पंतप्रधान मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : काल(७ फेब्रु.) लोकसभेत बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच काँग्रेसला महागाईची चिंता “यूपीए’’ सरकारच्या काळात का नव्हती?, असा सवालही मोदींनी केला आहे.

यावेळी बोलत असतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,‘काँग्रेसने ५० वर्षे राज्य केले. परंतु त्यानंतर त्यांनी सत्ता का गमावली? नागालँडने १९९८ मध्ये, ओडिशाने २७ वर्षांपूर्वी काँग्रेसला अखेरचे निवडून दिले होते. गोव्यात २८ वर्षांपूर्वी काँग्रेसने बहुमताने सत्ता मिळवली होती. त्रिपुरात १९८८ नंतर, तर पश्चिम बंगालमध्ये १९७२ नंतर काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही. परंतु असे असले तरी काँग्रेसचा अहंकार कमी झालेला नाही’, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘काँग्रेसला महागाईची चिंता ‘’यूपीए’’ सरकारच्या काळात का नव्हती? कोरोनाच्या काळात काँग्रेसचे सरकार असते तर महागाईचे खापर कोरोनावर मारून काँग्रेस नामानिराळा झाला असता. २०१४-२० या भाजपप्रणित सरकारच्या काळात चलनवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. २०२१ मध्ये हा दर ५.२ टक्के आणि खाद्यान्नाच्या चलनवाढीचा दर ३ टक्के होता. तसेच ७० च्या दशकापासून काँग्रेसने ‘’गरिबी हटाओ’’चा नारा दिला, गरिबी संपली नाही परंतु काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली’, असा टोलाही यावेळी मोदींनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!