मुंबई : गेल्या काही महिन्यापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. मात्र कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा ओसरु लागल्याने राज्य सरकारने हळुहळु लॉकडाऊनचे नियम शिथील केले आहे. यामध्ये मॉल, बार दारूची दुकाने खुले केले आहेत. मात्र चित्रपटगृह अद्याप ही बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे अनेक कलाकार नाराजी व्यक्त करत आहेत. बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने देखील याबाबत नाराजी व्यक्त करत सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

वरूणने शेअर केलेल्या व्हिडीओत मुंबईतील वांद्रे भागत गर्दी असलेली दिसत आहे. याद्वारे त्याने चित्रपटगृह बंद ठेवल्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वरूणने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘सगळं काही सुरू, मात्र चित्रपटगृह बंद का?’, असा सवाल उपस्थितीत करत त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने कोरोना संसर्गाच्या निर्बंधात शिथीलता आणण्याचा निर्णय घेतला. या नियमानुसार रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल, मॉल्स सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे अद्यापही बंदच ठेवण्याच्या निर्णयात राज्य सरकारने काहीच बदल केला नाही. इतर काही राज्यात चित्रपटगृहे सुरु करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रमध्ये अजून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंदच आहेत.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंनी केलं प्रकाश आंबेडकरांच कौतुक; तर अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न – डॉ. भारती पवार
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- पुणे पोलिसांची दादागिरी! दुचाकीस्वाराला गाडीसह टेम्पोत भरले, नागरिकांमधून संताप
- अशोक चव्हाणजी, आम्हीही ९६ टक्केवाले मराठे आहोत!’, संभाजीराजेंचा हल्लाबोल


