नवी दिल्ली: कोरोना काळामध्ये जगाप्रमाणे भारत देखील मोठ्या संकातून जात होता. यामध्ये आरोग्य यंत्रणा, सरकार वरील दबाव, आर्थिक नुकसान हे आणि असे अनेक आव्हानं भारतासमोर उभी होती. मात्र यातून देखील देशाने वेळोवेळी निर्णय घेत लॉकडाऊन केल. अत्यावश्यक सेवांनाच प्राधान्य दिले. अत्यावश्यक कर्मचार्यांनी आपली कर्तव्य चोख बजावले. आणि हळूहळू देशातील परिस्थिती सुधारत असताना अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली.
दरम्यान, अमेरिका इंग्लंड नंतर भारताने देखील लसीकरणाला सुरुवात केली. आणि कोरोनाच्या विरुद्ध लढाईतील एक मोठा टप्पापार पडला. आता भारत इतर देशांना देखील लस पुरवत आहे.
या पार्श्वभूमीवर या महामारीच्या काळात केलेल्या प्रयत्नांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे. ‘कोरोनावर भारताने नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी करुन दाखवल्याचे’ संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेड्रॉस ए. गेबरेसस यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या विषाणूवर आपण या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्यास सहज मात करु शकतो, भारताच्या कामगिरीवरुन हे आपल्याला दिसते. या प्रयत्नांमध्ये लसही समाविष्ट झाल्याने आता अधिक चांगले परिणाम घडून येतील अशी आपण आशा करतो, असेही आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात घटत असल्याचे दिसते आहे. दररोजच्या आकडेवारीत घट होत आहे, जी सप्टेंबर २०२०च्या मध्यावर सर्वात उच्च पातळीवर पोहोचली होती.
महत्वाच्या बातम्या
- निदेशकांना नियुक्तीची प्रतीक्षा: कोरोना काळात विनामानधन काम केले
- ‘पीएमसी बँक’ पुनरुज्जीवनासाठी १ फेब्रुवारीपर्यंत तीन गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव
- बहुतांश प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्याने लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा होतोय खोळंबा
- जो रूटचं शतक आणि भारताच्या खराब गोलंदाजीबद्दल ट्विटरवर भन्नाट कमेंट्स
- आधी सामनातून टीका आता राऊत म्हणतात नाना सर्वांनाच प्रिय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
