Share

कोण आहेत झारीतील शुक्राचार्य ? ऊसतोड कामगारांसाठी पंकजा मुंडे आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आगपखाड केली आहे.

ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या. त्यांचा संयम सुटणार नाही, याची काळजी घ्या. ते एका ठिकाणी 15 दिवस आहेत. एकही साधा शिंकला नाही, मग काय चिंता आहे. त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य?? असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी सरकार आगपाखड केली आहे.

पाच ते आठ हजार लोक एका ठिकाणी आहे. एक-दोन ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे या सगळ्यांना काय झालं तर कोण जबाबदार? Random चाचण्या करा, पण यांच्याबद्दलचा निर्णय तातडीने घ्या. ते जिल्ह्यात परतले तर गावाबाहेर आयसोलेटेड राहतील. त्यांची लेकरं, आई-बाप घरी एकटे आहेत हा विचारही करा. असंही पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहचवण्यासाठी पंकजा मुंडे मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. ऊसतोड कामगारांबाबत सकारात्मक निर्णय होईल असं सरकारने म्हटलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीत आता झारीतले शुक्राचार्य कोण? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. करोनाचं संकट देशावर घोंघावतं आहे. त्यामुळे लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशात विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत. त्यांची तपासणी करुन त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजा मुंडे मागील दोन ते तीन आठवड्यांपासून करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!