Share

मला अडीच वर्षे जेलमध्ये ठेवलं तेव्हा कुठे होता मराठी माणूस?; भुजबळांचा भाजपला सवाल

Published On: 

पुणे : मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीच वर्ष कशाला ठेवलं? तेव्हा कुठे गेला होता मराठी माणूस? आणि आता कोर्ट सांगत आहे की, त्यांनी काहीच केलं नाही, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे.

बहुचर्चित असणाऱ्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात आहेत. समीर वानखेडे याची बाजू घेणाऱ्या भाजपला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी चांगलेच फटकारले. याबाबत वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठी माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

समीर वानखेडे यांच्या आई लाडाने त्याच्या वडिलांना दाऊद हाक मारायच्या, यावरही भुजबळ यांनी मिश्किल शब्दात टिप्पणी केली आहे. भुजबळ म्हणाले की, मी पहिल्यांदा ऐकलं की लाडाने दाऊद म्हणतात, आमच्याकडे अहो जा हो, मुन्नू, टून्नू, अशी हाक मारतात. या संपूर्ण प्रकरणात रेड खरी होती का?, तसेच समीर वानखेडे यांनी जातीचे आरक्षण घेऊन भारत सरकारला फसवलं आहे का? या सगळ्या बाबी तपासात समोर येतीलच. नवाब मलिक पुराव्यासह सर्व गोष्टी समोर आणताहेत. त्यामुळे सत्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!