Share

Assembly Session 2022 | पंतप्रधान आवास योजनेचा खरा लाभार्थी गेला कुठे?, बच्चू कडू आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येणारा पाऊस धो-धो पडला तर तो दिसतो. पण सरकारी धोरणं जे तलवार चालवतात त्याचे काय? आम्ही सगळे मिळून कसायासारखे शेतकऱ्याला हळूहळू कापतो ते दिसत नाही. आम्ही सगळेच नालायक, आमच्याएवढे नालायक कुणीच नाही. जखम झाल्यावर त्यावर मीठ टाकणारी आपण औलाद आहोत. उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं अशा शब्दात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत घणाघात केला.

पक्षविरोधी कायदा संपवून टाकला पाहिजे. तुमच्या भागात एखादं नुकसान झालं, कायदा आडवा येत असेल तर मी बोलू शकत नाही कारण माझ्या पक्षाचे सरकार आहे. अमेरिकेत कुठे पक्ष आहेत? मते जनतेची आणि हुकुमशहा नेत्यांची. अतिवृष्टीत नुकसान झाल्यावर देतो किती तर ५ हजार. घराचं छप्पर पडलं. घरात काहीच राहत नाही. सगळं उद्ध्वस्त होतं. कधी कधी लाज वाटते. त्यांना ५ हजार देतात. त्यात काय होणार? असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केला. घर द्यायचं असेल तर सर्व्हे करण्याचं गरज काय? नदी, नाल्यात जेवढे मेले नाहीत तितकेच घर पडून मेले. झोपेत माणसं मेली. मातीची घरे. घरांच्या इतक्या योजना राबवल्या जातात मग खरा लाभार्थी गेला कुठे? पडलेले घर तुम्हाला दिसत नाही. कोण आहेत ते नालायक अधिकारी? अशा अधिकाऱ्यांना लाथा मारायला हव्यात असंही बच्चू कडू संतापून म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!