मुंबई : सध्या मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. मुंबईतील अनेक ठिकाण जलमय झाले आहेत. वीजपुरवठा देखील काही वेळ खंडित करण्यात आला होता. काही ठिकाणची रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली होती. जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र सध्या मुंबईत बघायला मिळत आहे. या परिस्थितीवर अद्यापही कुठल्याच सिनेअभिनेता, अभिनेत्री, सेलेब्रेटी यांनी कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सिलेब्रेटींवर टीका केली आहे.
त्यांनी म्हंटले की, मुंबईत एवढा मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे आणि मुंबई पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी कोणत्याच सेलिब्रेटिंनी साधी एक पोस्ट देखील केली नाही. अगोदर मुंबईचे कौतूक करत होते ते त्यांच्या स्क्रिप्टचा भाग होता की त्यासाठी त्यांना पैसे मिळायचे? आमची मुंबई म्हणत प्रेम दाखवणारे सेलिब्रेटी सध्या कोठे आहेत असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
How come after such heavy “rain drops” not a single celeb posting or tweeting abt the situation in mumbai?
Or all those post r script written just like their dialogues n all done only for money!
Where is the love for amchi mumbai?— Nitesh Rane (@NiteshNRane) July 19, 2021
दरम्यान, मुंबईतील सध्यस्थिती पावसामुळे बिकट झाली आहे. अनेक दुर्घटना देखील मुंबई व भोवतीच्या परिसारत घडल्या आहे. मुंबईतील चेंबूर व विक्रोळी येथे मुसळधार पावसामुळे भिंत व घरं कोसळल्याने अनेक नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला. हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरीत्या घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जालन्यात काँग्रेस पक्ष टिकवणाऱ्या आ.कैलास गोरंट्याल यांना मंत्री करा’, समर्थकांची मागणी
- ‘ठाकरे सरकारमध्ये नेते कमी अन् बोलके पोपटच जास्त’, ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा टोला
- ओबीसींना संघटित करून अधिक सक्षम करणे हेच आपले अंतिम ध्येय-देवेंद्र फडणवीस
- ‘देशमुखांचे वय झालेय, त्यांना आता लपाछपीचा खेळ झेपणार नाही’, अतुल भातखळरांचा टोला
- कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार-संजय राठोड


