Share

अकोले तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना, लोकप्रतिनिधी कुठे आहेत?- वैभव पिचड

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांनी ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये अकोले तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत असून, तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ऑक्सिजन, औषधे, किट यांचा तुटवडा आहे.

अकोले तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना लोकप्रतिनिधी कुठे आहेत, त्यांनी आता बाहेर पडून जनतेच्या समस्या सोडविल्या पाहिजेत, असे मत माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त करत त्यांनी आ.किरण लहामटे यांच्यावर निशाणा साधला आहे.

वैभव पिचड म्हणाले की, अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून कोरोना चाचणीसाठी लागणारे किट उपलब्ध नाही. पूर्वी याठिकाणी कार्डियाक रुग्णवाहिका होत्या. परंतु अशा महामारीच्या काळात त्याही दुसरीकडे हलविल्या आहेत. शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने राबविण्यासाठी योग्य ती पावले उचलावी लागतात व त्यात लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. असा आरोप पिचड यांनी केला आहे.

तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. सरकार व प्रशासन याबाबत कमी पडत आहे,
तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी खानापूर येथे नेले जाते. परंतु खानापूर हे उपचार केंद्र नसून केवळ रुग्णांना दाखल करण्याचे ठिकाण आहे. अशी टीकाही पिचड यांनी केली. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अकोले व्यापारी संघटनेने १४ सप्टेंबर पासून आठ दिवस जनता कर्फ्यु लागू करून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पिचड यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!