Share

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा आत्मसमर्पण कधी करणार? समोर आली मोठी माहिती…

Published On: 

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या आरोपात केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा अशिष मिश्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप अटक झाली नाही. अशिष मिश्रा फरार झाल्याची देखील काहीप्रमाणात चर्चा होताना दिसत  आहे. यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी अशिष मिश्राच्या दरवाजावर समन्स चिटकवले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा रात्री उशिरापर्यंत लखीमपूर खेरीला पोहोचतील आणि त्यानंतर ते उद्या पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाला सादर करतील. त्यामुळे आशिष मिश्रा उद्या म्हणजेच शनिवारी पोलिसांसमोर हजर होऊ शकतात. दरम्यान, आशिष मिश्रा नेपाळला पळून गेल्याच्या काही बातम्या सकाळी माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या होत्या, पण याची अधिकृतपणे अद्याप पुष्टी झालेली नाही.

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयात हरीश साळवे यूपी सरकारच्या वतीने हजर झाले. या सुनावणीत सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी युपी सरकारला फटकारले आहे. या दरम्यान, सरन्यायाधीशांनी हत्या प्रकरणातील आरोपीला वेगळी वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न यूपी सरकारवर उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!