🕒 1 min read
सोलापूर : नुकत्याच जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या पडल्या. अशातच आता सोलापूर महानगरपलिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. पवार हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक आयोग कोणाच्या नेतृत्वाखाली लढायचा याबाबतचा निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, यावर पवार यांनी आज ठोस भूमिका घेतली नसल्याचे दिसून आले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे. जर सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे माझे मत आहे’ असे वक्तव्य पवार यांनी केले. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना त्यांनी आघाडी होणार की नाही यावर सूचक भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे. जर सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे माझे मत आहे. #Solapur
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 8, 2021
ते म्हणाले, आज सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा झाली. यापूर्वीच्या निवडणुकीकडे आपण हवे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे विरोधी विचारांच्या हातात मनपा गेली आणि सोलापूर शहराचा विकास खुंटला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे. जर सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे माझे मत आहे.’
‘५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. तसेच पक्षवाढीसाठी जशी अनुभवी नेत्यांची गरज असते त्याप्रमाणे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तरुणांना पुढे केले पाहिजे. या निवडणुकीत तरुणांना संधी द्या, त्यांना विसरू नका, हा माझा आग्रह राहील. एकेकाळी सोलापूर शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जायचे. सोलापूर शहरात मोठी कारखानदारी होती. मात्र आता सोलापूरला कारखाने दिसत नाहीत. सोलापूर मनपात राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात असा माझा आग्रह आहे, कारण मला सोलापूरचे जुने दिवस आणायचे आहेत असे आवाहन पवार यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- ‘ड्रग्ज प्रकरणाचे राजकारण करणाऱ्या मलिक यांनी ते पालकमंत्री असलेला जिल्हा वाऱ्यावर सोडला’
- राज्यात येत्या 6 दिवसात 90 लाख नागरीकांचं होणार लसीकरण; टोपेंनी केली ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेची घोषणा
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- ‘देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात आल्याने खेळांना प्रोत्साहन मिळत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
