मुंबई- पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. ते समाजमाध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना केले.
महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. दिवाळीनंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही, दुसरी तिसरी लाट येऊ शकते. कृपा करून सगळं सुरू केलं म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही हे लक्षात घ्या असंही मुख्यमंत्री म्हणाले.
ज्या राज्याचा मुख्यमंत्री कायम घरी बसलेला असतो ते राज्य सतत धोक्याच्या वळणावर असते…#वाफा@8pm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 22, 2020
कोरोना गेलेला नाही, सावध राहा. आपण धोक्याच्या वळणावर आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर भाजपने टीका केली आहे. ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू : हसन मुश्रीफ
- बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन
- कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे
- IND vs AUS : पहिल्या कसोटी सामन्यात रोहित-इशांत खेळणार का? अजूनही संभ्रम कायम
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका


