Share

मुंबईच्या धर्तीवर औरंगाबादेत मालमत्ता कर माफी कधी? सर्वपक्षीय नेत्यांची पालकमंत्र्यांना मागणी..!

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकारने मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर औरंगाबाद शहरातील मालमत्ताधारकांनाही पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कराला माफी मिळावी अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांकडून होत आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील ५०० स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादेतील गुंठेवारीतील घरांचा प्रश्नही अद्याप सुटला नाही. देसाई यांच्यावर भाजप, एमआयएमने प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका आ.अतुल सावे यांनी केली. तर औरंगाबादेत गरीब नाहीत का? असा सवाल खा. इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता.

त्यामुळे औरंगाबादेतही हा निर्णय लागू करावा, अशी मागणी जोर धरत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावला आहे. मुंबईत ५०० स्क्वे. फूट घराला मालमत्ता करातून वगळण्यात यांवर आले आहे. या निर्णयामुळे लाखो रहिवाशांचा फायदा होणार आहे. मुंबईतील हा निर्णय औरंगाबादसाठी मात्र, लागू नाही. शहरात जवळपास दीड लाख सिडकोच्या घरांचा प्रश्न अद्याप सुटलेली नाही. गुंठेवारीतील घरांचा प्रश्न रेंगाळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने निवडणूक डोळ्यासमोर ठेवलेली घोषणा आता टीकेचे लक्ष बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!