Share

‘काहीही झाले की मीच केले’, आजबेंचा धसांना टोला

Published On: 

बीड : आष्टी मतदारसंघात विरोधकांना काहीही दिसले की माझेच आणि मीच केले असे, असे म्हणायची सवय लागल्याची अप्रत्यक्ष टीका आमदार बाळासाहेब आजबे यांनी भाजप आमदार सुरेश धसांवर केली.

ग्रामपंचायत निवडणुकीत आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरूर या तीनही तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीला कौल दिला आहे. परंतु, काही विरोधक खोटे बोल पण रेटून बोल याप्रमाणे जनतेला दिशाभूल करतात. खोटे आकडे सांगून सर्वच ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्याचे सांगत आहेत. विरोधकांचे हे दावे जनतेची दिशाभूल करणारे आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार आजबे म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य आपणास भेटण्यासाठी आले होते. यातील बहुतांश सदस्य हे राष्ट्रवादीला, तर काही महाविकास आघाडीतील घटक पक्षाला मानतात. त्यामुळे मतदारसंघात भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जास्त संख्येने निवडून आलेत. विरोधक मात्र खोटे बोलत आहेत. त्यांचे आकडे हे जनतेची दिशाभूल करणारे आहेत, असे आजबे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!