Share

‘मोदी जे बोलतात ते खोटच असतं; त्यांनी आयता मिळालेला देश विकायला काढलाय’

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील आंबेडकर चौकात संयुक्त किसान मोर्चासह विविध पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारत बंद जनआक्रोश आंदोलन झाले. या आंदोलनामुळे चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली. आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंद ऐलान करण्यात आले होते. त्याअनुषंगाने देशभरात विविध ठिकाणी जनआक्रोश आंदोलन झाले. पिंपरी चिंचवड येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना, संयुक्त कृती समिती जन आंदोलन संघर्ष समिती, महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले, ‘एफडीआय या गोंडस नावाखाली भांडवलदारांना सवलती देऊन गरीबांचे शोषण करणारी यंत्रणा पंतप्रधान मोदी – शहा यांचे सरकार उभी करीत आहे. भारतात उत्पादीत होणारे इंधन आणि आयात केलेले इंधन नफेखोरीच्या उद्देशाने एकाच दराने सरकार विकत आहे,’ असा आरोप अभ्यंकर यांनी केलाय.

पुढे ते म्हणाले, ‘भाजपाचे प्रवक्ते आणि बौध्दिक मवाली लोकं सोशल मिडीयात वाटेल ते खोटं बोलतात. वृत्तवाहिनींच्या चर्चांमध्ये देखील धडधडीत खोटं बोलतात. त्यांचे हे बदमाशीचे खेळ आता नागरिकांच्या लक्षात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते खोटं बोलतात तसेच त्यांचे प्रवक्ते देखील खोटं बोलतात. काँग्रेसच्या काळात काय झालं असं हे विचारतात. मोदी सरकार आता जे काय विकत आहे ते काँग्रेसनेच उभे केल आहे. आयता मिळालेला देश भाजपाने विकायला काढला आहे,’ असा गंभीर आरोप अभ्यंकर यांनी यावेळी भाजपवर केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!