मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेऊन सकाळ-सकाळी सरकार स्थापनेची शपथ घेतली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आता पश्चाताप व्यक्त केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
याबाबत नवाब मलिक ट्विट करत म्हणाले, ‘चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय, सत्ता बिना रहा ना जाए!’ असा टोला नवाब मलिकांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय,
सत्ता बिना रहा ना जाए !!! https://t.co/3TLXCjK4tO— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 30, 2021
आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी जशास तशे उत्तर देण्याचा उत्तर केला, याचा मला आता पश्चाताप होत आहे. आणि आता असेही वाटते की असे झाले नसते तर चांगले झाले असते. मी आता एक पुस्तक लिहीत आहे, त्यात हा सर्व घटनाक्रम उजागर करणार असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कोरोना काळात महाराष्ट्राला झालेले नुकसान यावरुन निशाना साधला आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे झालेल्या १० हजारांवर मृत्यूंच्या आकड्यांना लपवले आहे. कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले, या कठीण काळात महाविकासअ ाघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं. अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरच्या सीईओ पदी पराग अग्रवालांची नियुक्ती; कंगनाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
- ‘बालहट्टाचा भुर्दंड मुंबईकरांच्या माथी’, पेंग्विन कंत्राट प्रकरणी भाजपा आक्रमक
- शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला- चंद्रकांत पाटील
- मुंबई जिल्हा परिषदेचा अजब कारभार; उर्दू शाळेत केली मराठी शिक्षकाची नेमणूक
- जयंतराव तुम्ही आपला २५ वर्षाचा संसार मोडला; गिरीश महाजनांचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

