मुंबई : मागील काही महिन्यापासून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा सामना सुरु असताना दिसतो. अनेक मुद्यावरून वादविवाद होत असतात. नुकतेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्यावर निशाणा साधला. रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेरुळाच्या बाजूला असलेली घरे हि पूनर्वसनाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन तिथल्या रहिवाशांना दिले होते. परंतु इथल्या रहिवाशांना घरे खाली करण्याबाबद नोटीसा येत आहेत. या मुद्यावरून जितेंद्र आव्हाडांनी खोचक निशाणा साधून ट्विट केले.
ट्विटमध्ये “गरीब की जान क्या जान नही होती साहब?” रावसाहेब दानवे, उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका” असे बोलत खोचक टोला रावसाहेब दानवे यांना आव्हाडांनी लगावला आहे. रावसाहेब दानवे यांनी जो पर्यंत रहिवाशांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही असे आश्वासन दिले होते. असे बोलले असतानाही रावसाहेब दानवे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे रूळावरील परिसराचे घरे खाली करण्यसाठी आदेश देऊन रहिवाशांना धमकविण्याचे सत्र देखील सुरु केले असा आरोपही केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

