🕒 1 min read
मुंबई : नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांन पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजप उमेदवार शुभेंद्र अधिकारी व ममता बॅनर्जी यांच्यात आज सकाळपासूनच अटी-तटीचा सामना पाहायला मिळात होता. सुरुवातीला ममतादीदी जिंकल्या असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, परत फेरमतमोजणी केल्यानंतर भाजपचे उमेदवार शुभेंद्र अधिकारी विजयी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासून शुभेंद्र अधिकारी हे आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी अचानक चित्र पालटले आणि ममतादीदींनी आघाडी घेतली. तसेच काही वेळापूर्वी १२०० मतांनी ममतादीदींना विजयी घोषित करण्यात आले होते. ममतादीदी विजयी झाल्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण देखील पाहायला मिळत होते. परंतु शुभेंद्र अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणी करण्याची मागणी केली. व या फेरमतमोजणी मध्ये शुभेंद्र अधिकारी हे विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. परंतु त्यांनी त्यांचा हा पराभव अमान्य केला. त्यांनी जिल्हाधिकार्यांना भेटून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली असल्याची माहिती सध्या मिळत आहे. तसेच त्यांनी या निकालाविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचे देखील सांगितले आहे.
दरम्यान, आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करून नंदीग्राममधील ममता दीदींच्या पराभावर प्रतिक्रिया दिलेली आहे, ‘रडीचा डाव! बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला रडीचा डाव एवढंच म्हणता येईल!’ अशा आशयाचे ट्वीट पवारांनी केले आहे. परंतु यामधून पवारांनी नेमके कोणाला लक्ष केले आहे? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
दरम्यान ,शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बंगालच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ममतादीदींच अभिनंदन; दिलं ‘हे’ आश्वासन !
- बंगालचा गड आल पण नंदीग्राममधून वाघीण पराभूत ; निकालाविरोधात बॅनर्जी जाणार कोर्टात
- जयंत पाटलांनी सांगितलं राष्ट्रवादीला जिव्हारी लागणाऱ्या पंढरपूरच्या पराभवाचं कारण, म्हणाले…
- केरळात राष्ट्रवादीचा डंका; २ जागांवर दणदणीत विजय !
- ‘अजितदादा तुम्ही दिवस मोजायला लागा; फडणवीसाहेबांनी ठरवलेल्या करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात झालीये !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

