🕒 1 min read
दिल्ली : देशात कोरोना संकट वाढत असतानाच केरळ, पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणूक पार पडल्या होत्या. यानंतर, आज मतमोजणी पार पडत असून निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे दिग्गज नेते मैदानात उतरले होते.
दरम्यान, आता निकाल जाहीर होत असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यांनी कडवी लढत दिली आहे. यामुळे भाजपने मागील निवडणुकांपेक्षा मोठी मुसंडी मारली असली तरी दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. तर, आतापर्यंत तृणमूल काँग्रेसने २०० हुन अधिक जागांवर विजय मिळवला असून पक्ष २२३ हुन अधिक जागांवर विजय मिळवेल असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
Congratulations to Mamata Didi for @AITCofficial's win in West Bengal. The Centre will continue to extend all possible support to the West Bengal Government to fulfil people’s aspirations and also to overcome the COVID-19 pandemic. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2021
बंगालमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीका होत असतानाच मोदींनी ट्विटद्वारे ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. ‘तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममतादीदींचं अभिनंदन ! लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोविड-१९ रोगाच्या साथीवर विजय मिळवण्यासाठी केंद्र सरकार पश्चिम बंगाल सर्वतोपरी मदत करणे सुरूच ठेवेल,’ असं आश्वासन देखील मोदींनी ममता बॅनर्जी यांना दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणारच पण… , पंढरपूर विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
- बंगालचा गड आल पण नंदीग्राममधून वाघीण पराभूत ; निकालाविरोधात बॅनर्जी जाणार कोर्टात
- जयंत पाटलांनी सांगितलं राष्ट्रवादीला जिव्हारी लागणाऱ्या पंढरपूरच्या पराभवाचं कारण, म्हणाले…
- केरळात राष्ट्रवादीचा डंका; २ जागांवर दणदणीत विजय !
- ‘अजितदादा तुम्ही दिवस मोजायला लागा; फडणवीसाहेबांनी ठरवलेल्या करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात झालीये !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

