Share

“रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतील मतदारांनी काय कमावले?” ; निलेश राणेंचा प्रश्न  

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : काल सोमवारी २३ मे २०२२ रोजी लोकसभेचा ८ वर्षांचा काळ पूर्ण झाला. भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्या कामकाजाचा पंचनामा केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात स्थानिक खासदार म्हणून निवडून येऊन विनायक राऊत यांना काल ८ वर्षे पूर्ण झाली. या आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदार संघाने काय कमावले? असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

या आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदार संघाने काय कमावले याचे ऑडिट व्हायला हवं , असं निलेश राणे यांनी सांगतानाच कोणतेही उल्लेखनीय कार्य या मतदार संघात घडलेले नाही यावर त्यांनी प्रकाश टाकला. स्थानिक खासदारांनी मतदारसंघात कोणतेही कारखाने, उद्योग आणले नाहीत, या काळात कोणतीही रोजगारनिर्मिती झाली नाही. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोना काळात स्वतः पुढाकार घेऊन एकही कोरोना सेंटर त्यांनी बांधले नाही, असे बोलत निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!