Share

Sanjay Raut | बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली – संजय राऊत

Published On: 

मुंबई : गेल्या महिनाभरात शिवसेनेला मोठे झटके बसले आहेत. शिवसेना आमदारांनी बंड केला, सत्तातंर झालं, खासदारांचा देखील वेगळा गट तयार झाला. सर्व बंडखोर आमदार, खासदार स्वत:ला शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिष्य म्हणत आहे. यातून आता शिवसेना काय शिकली, शिवसेनेची पुढची भूमिका काय असेल, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला. त्यांनी विश्वासघात केला. मात्र काम करताना विश्वास ठेवावा लागतो. त्याशिवाय पक्ष पुढे जात नाही. ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याच्या मनात नेमकं काय चाललय, हे आपल्याला कळत नाही. तो वेगळाच विचार करत असतो. जोपर्यंत स्वार्थ आहे, तोपर्यंत विश्वासघात सुरुच राहील.”

या सर्व प्रकरणात शिवसेना नेतृत्वांचे काही चुकले का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले. “चुका सगळीकडे होतात, घरात देखील होतात. राजकारणात देखील चुका होतात. याचा अर्थ ज्या पक्षाने भरभरुन दिलं आहे त्यांच्याशी विश्वासघात करणे नाही. जे लोक आज प्रश्न विचारत आहेत. त्यातील काहीजण नगरसेवक पदापासून दिल्लीपर्यंत, मंत्री पदापर्यंत पोहचले. मात्र लालसेपोटी यांनी घाव घातला. बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली. माणसांचे सरदार केले आणि त्या सरदाराने शिवसेनेवरती घाव घातला.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!