🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नगर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाची निवड झाली. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून मनोज कोतकर यांचे नाव अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ, असे सांगण्यासाठी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे रात्री साडेबारा वाजता शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना भेटले होते. काल खुद्द कोरगावकर यांनीच हा गौप्यस्फोट शिवसैनिकांसमोर केला. मात्र मी त्यांना वरिष्ठांचा निर्णय पाळणार असल्याचे सांगत जय महाराष्ट्र केला, असेही ते म्हणाले.
अहमदनगरमध्ये स्थायी समिती सभापती निवडणुकीत राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. या निवडणुकीत सभापतीपदी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांना संधी मिळाली होती. मनोज कोतकर यांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी हा अर्ज मागे घेतला. नगर शिवसेनेत उफाळून आलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या बैठकीत भाऊ कोरगावकर यांनी शिवसैनिकांसमोर स्थायी समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी सांगत एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, स्थायी समिती सभापती निवडीच्या आदल्या रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान महापौर बाबासाहेब वाकळे मला भेटले होते, त्यांनी मला विचारले तुमचा फॉर्म ठेवणार का नाही? त्यावर मी म्हणालो, ते वरती ठरेल. त्यावर ते म्हणाले, तुम्ही फॉर्म ठेवा, आम्ही मतदान करू. पण मी त्यांना स्पष्ट सांगितले, जे आमच्या पक्षात वरून ठरते ते आम्ही करतो.
यानिमित्ताने मात्र नगर महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवीन खेळी करण्याचा डाव होता. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे’
- सोलापूरमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; एमआयएम फुटीच्या उंबरठय़ावर
- पुणे विद्यापीठाचा अनागोंदी कारभार; सराव परीक्षा देतानाच विद्यार्थ्यांना करावा लागतोय गंभीर समस्यांचा सामना
- नगर शिवसेनेत उफाळून आलेल्या वादावर अखेर पडदा; शिवसेनेचा प्रवास एकीच्या दिशेने!
- ‘पोकळ आश्वासने देऊन उपयोग नाही,गुन्हेगारांना जरब बसेल,अशी पावले सरकारने उचलली पाहिजेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
